-
निव्वळ किंवा निखळ योगायोग!
एखाद्या क्रमांकाची बस आपल्याला त्याच वेळी, त्याच ठिकाणी; पण वेगळ्या दिवशी दिसली तर? फार काही आश्चर्य वाटण्यासारखी घटना नक्कीच नाही ही. शहरातील परिवहन सेवेच्या – सिटी बस – बाबत असं वारंवार घडतं. कारण त्याच बस विशिष्ट मार्गावर सतत धावत असतात. अगदी लहानपणी पुण्यात एकदा असं घडलं होतं. आम्ही बाजारात गेलो आणि बाजारातून परत आलो, ते…
-
सफर घडविणारा सहप्रवासी
प्रवास करीत होतो. जवळच जायचं होतं. राहुरीला. ‘लाल परी, प्रवासासाठी बरी’, हे आपलं तत्त्व. कवठे महांकाळवरून सकाळी कधी तरी सुटलेली बस सांगोले, पंढरपूर, टेंभुर्णी, करमाळा करीत नाशिककडे निघाली होती. नगरच्या मुख्य बसस्थानकावर (खरं म्हणजे ते आता दुय्यम स्थानक झालं आहे. मुख्य आहे ते तारकपूर. पण जुनी सवय जात नाही.) फार प्रवासी बसले नाहीत. बऱ्यापैकी जागा…
-
मासवडीची मेजवानी
पशुधन एक्स्पो म्हणजे पशुसंपदेचं प्रदर्शन. साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवस हे प्रदर्शन झालं. ‘बघून तरी यावं एकदा,’ म्हणून रविवारी गेलो. मैदानावर गेल्या गेल्याच उजव्या हाताला खाऊगल्ली दिसली. पण लगेच जाण्याचा मोह टाळला. उन्ह चटकत होतंच. त्याचा ताप कमी व्हावा म्हणून ग्लासभर ताकाला न्याय दिला. धूळ, उन्ह आणि गर्दी अपरिहार्य होती. दोन तास भरपूर फिरलो. पशुपालकांशी-मालकांशी गप्पा…
-
‘भावखाऊ’ गवार
भाज्यांमध्येही आवडत्या नि नावडत्या असतात. अनेक महिने-वर्षं खाणावळीत जेवणाऱ्यांना विचारा. त्यांचा मंडईशी संबंध येत नाही सहसा; पण कोणती भाजी मुबलक आणि म्हणून स्वस्त आहे, हे त्यांना कळतं. त्याचं कारण तीच भाजी त्यांच्या ताटात वाढून ठेवलेली असते. परिणामी अशा नेहमी दिसणाऱ्या भाज्या त्यांच्यासाठी ‘अतिपरिचयात अवज्ञा’ म्हणून नावडत्या बनतात. त्यात बहुदा अव्वल क्रमांक लागत असावा दुधी भोपळ्याचा!…
-
खमंग, झणझणीत, सणसणीत!
तो मंगळवार होता. म्हणजे भाज्या आणायचा दिवस. नगरचा कोणे एके काळचा बाजारचा दिवस. बाकी बाजार भरत नसला, तरी भाज्या भरपूर येत. अलीकडच्या वर्षभरात मंगळवारी भाज्या घेऊन येणारे शेतकरी विक्रेते का कुणास ठाऊक कमी होऊ लागले आहेत. मंडई खरी फुलते ती रविवारी. आणि बुधवारी सकाळच्या दोन तासांत – नऊ वाजेपर्यंत. भरपूर भाज्या आणून ठेवल्यामुळे मंगळवारचा मुहूर्त…
-
पावसाचा पाठलाग
मुंबईचा पाऊस बातम्यांमधून वाचत-पाहात आलो आहे. पावसाळ्यात मुंबईला गेलो नाही आणि चुकून एकदा कधी गेलो होतोच, तर त्याचं ते रुद्रभीषण रूप अनुभवता आलं नाही. त्याची भीती वाटते आणि त्याबद्दल औत्सुक्यही. एक आठवतं – तीन दशकांपूर्वी ‘सांज लोकसत्ता’च्या मुलाखतीसाठी मुंबईला गेलो होतो. दि. ५ किंवा ६ जुलै असेल. मुलाखतीत काही दम नव्हता. म्हणजे माझ्याच उमेदवारीत. मुलाखत…
-
चटकदार चिवडा!
‘चहा-चिवडा’ हा व्याकरणदृष्ट्या द्वंद्व समास आहे. असं असलं तरी ह्या दोन्ही गोष्टींना कोणतेही नियम लागू होत नाहीत. समास वगैरे तांत्रिक, रुक्ष व्याकरणाशी त्यांना काही देणं-घेणं नसतं. त्याच्या जोडीला समोसा आला तरी चालतो नि बिस्किटांना यायलाही काही हरकत नसते. फेसबुकवर मी असतो प्रामुख्यानं दोन गोष्टींसाठी – गेम खेळण्यासाठी आणि काही चांगलं वाचण्यासाठी. वाचण्यातही दोन गोष्टी येतात…
-
आत्मीयतेच्या सुरांची अनुभूती…
प्रेक्षकांमध्येच बसलेल्या आणि आशाबाईंच्या फटकेबाजीला मनमोकळी दाद देणाऱ्या लताबाईंचे ते पहिले रूप मनावर ठसले. वीर जवानाची माहिती पाहता-ऐकताना त्यांचे डोळे पाणावत होते. ते दृश्य अजूनही नजरेसमोरून जात नाही.…लता मंगेशकर ह्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत नवी दिल्लीत कार्यरत असणारे वरिष्ठ पत्रकार मंगेश वैशंपायन ह्यांनी. ‘हिंदी सिनेसंगीताला सध्या आलेली मरगळ लवकरच दूर होईल आणि संगीताचा सुवर्णकाळ पुन्हा परत…
-
काठियावाडी ‘जमण’ नि ‘जगदीश’चं फरसाण
हे वाचणाऱ्या सगळ्यांना माहीत आहे, तरी आधीच स्पष्ट करतो – मी अस्सल मराठी माणूस आहे; गुजराती नाही. कुणी तरी, कुठं तरी लिहिलेलं आहे की, प्रवास म्हणजे गुजराती माणसासाठी जणू खाण्याची संधीच असते. हे अस्मादिकांनाही लागू पडतं. म्हणून तर आधीच स्पष्टीकरण देऊन टाकलं. बरीच मंडळी प्रवास करतात ते पाहण्यासाठी. आपला मात्र असतो खाण्यासाठी!प्रवासाला जायचं ठरलं की,…